फलटण नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन व पालखी उत्सव समिती व सहकारी संस्था या सर्वांनी मिळून उत्तम नियोजन करून फलटण शहरात आलेल्या माऊली भक्तांची चांगल्या प्रकारे सोय करून दिली. एकंदरीत सकाळपासून आलेल्या माऊली भक्तांची संख्या पाहता सुमारे पाच लाख पेक्षा जास्त माऊली भक्त फलटणमध्ये दाखल झाले आहेत अशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा होती. आज रात्री फलटण शहरात मुक्काम केल्यानंतर उद्या भल्या पहाटे पुढच्या प्रवासासाठी सर्व माऊली भक्त व पालखी बरडच्या दिशेने रवाना होईल व पुढचा मुक्काम बरड या ठिकाणी होईल असे पालखी उत्सव समिती यांच्याकडून सांगण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे संत नामदेव मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपान देव त्याचप्रमाणे इतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातर्फे आलेल्या पालखी व दिंडी यांचे आषाढी एकादशीच्या दिवशी 28 जून रोजी वारीचे शेवटचे ठिकाण पंढरपूर येथे आगमन होईल. सर्व वारकरी विठ्ठल रुक्माई यांच्या भेटीस जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन वारकरी आपल्या घरच्या प्रवासाच्या दिशेने निघतील.
The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.
happy to Help 9920654232@upi